crop nuksan bharpai आता शेतकऱ्यांना मिळणार शेतीच्या नुकसानीची मदत त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या गारपीठ आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असेल आणि नुकसान भरपाई मिळवायची असेल.
तर यासाठी ७२ तास म्हणजेच तीन दिवसाच्या आत तक्रार करणे आवश्यक असते अन्यथा भरपाई पासून वंचित राहावे लागते. crop nuksan bharpai
अशी करा नुकसानीची ऑनलाईन तक्रार
- प्ले स्टोअर वर जाऊन Crop Insurance नावाचे अप्लिकेशन मोबाईल मध्ये डाउनलोड करून चार पर्यायांपैकी तीन नंबरचा पर्याय नोदणी खात्याशिवाय खाते सुरु ठेवा हा पर्याय निवडा.
- त्यानंतर पाच प्रकारचे पर्याय आपल्यासमोर येतील त्यातील पिक नुकसान हा पर्याय निवडा त्यानंतर पिक नुकसानीची पूर्व सूचना आणि पिक नुकसान सद्यस्थिती असे दोन पर्याय येतील त्यातील पिक नुकसानीची पर्व सूचना हा पर्याय निवडा.
- त्यानंतर मोबाईल क्रमांक भरून त्यावरील ओटीपी टाकून सबमिट करा त्यानत हंगाम, वर्ष, योजना, राज्य अशी माहिती भरा.
- नोंदणीचा स्त्रोत या तक्त्यामध्ये विम्याचा फार्म कुठून भरला त्याची माहिती भरणे आवश्यक आहे.
- विमा पॉलीसी क्रमांक भरा विम्याची संपूर्ण माहिती दिसेल त्यानंतर कोणत्या पिकाचे नुकसान झाले आह ते निवडा.
- आता तुमच्या मोबाईल वरील अप्लिकेशनला लोकेशन एक्सेस द्या तपशील मध्ये घटनेचा प्रकार, दिनांक वेळेसह , पिक वाढीचा टप्पा नुकसानीची संभाव्य टक्केवारी, फोटो, व्होडीओ अशी अशी माहिती भरून सादर करा. या बटनावर क्लिक करां
- यानंतर जो डॉकेट आयडी नंबर येईल तो जपून ठेवा त्यांनतर नुकसानीची माहिती आपल्या गावातील तलाठ्याला देणे सुद्धा खूप आवश्यक आहे.